शब्द बापुडे केवळ वारा भाषा आणि शब्द सारखे बदलत असतात . काही शब्द लिहिले जातात पण कधीच बोलले जात नाहीत. "व". आपण "आणि" म्हणतो. मी व तू असं कोणी म्हणत नाही. "देखील" हा पण जवळपास तसाच, पण काही लोकं म्हणतात. पूर्वीच्या लिखाणात "करावयाचे, लिहावयाचे" असे शब्द वारंवार येत असत. तेही उच्चारले जाणारे नव्हते. मोद हा आनंद या अर्थाचा शब्द कोणी उच्चारलेला माझ्या ऐकिवात नाही. क्षुधा म्हणजे भूक. म्हणताना भूक, लिहिताना भूक किंवा क्षुधा. गोडसे भटजींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्यात "मजला क्षुधा नव्हती" असा उल्लेख आहे. आणखी एक गडबड करणारा शब्द म्हणजे मैलाचा दगड. दोन शब्द आहेत. पण मला अजिबात आवडत नाहीत. इंग्रजी milestone हा खडबडीत अनुवाद आहे. मैलाचा दगड हे मराठी भाषेतून हद्दपार होईल तो दिवस मैलाचा दगड म्हणून साजरा करायला हरकत नसावी. मागे एकदा कुठेतरी जेवायला गेलो होतो तेव्हा "आता जेवणाला न्याय द्या" हे शब्द ऐकल्यावर मी त्याऐवजी माझ्या व्हिस्कीला न्याय द्यायचं ठरवलं. "प्रस्तुत लेखक" हे अजून एक! This writer चं शब्दशः भाषांतर. सुदैवाने ...
टाळ्या आणि टाळ्या (हशा मात्र मनातल्या मनात) टाया वाजविती पानं दंग देवाच्या भजनी अशी एक बहिणाबाईंची कविता आहे. त्यात झाडांची पानं देवाचं भजन करत आहेत अशी कल्पना आहे. प्रत्यक्षात आपण टाळ्या वेगळ्याच कारणाकरता वाजवतो, आणि अपेक्षा करतो. फक्त टाळ्यांकरता वरचा सा लावून ठेवणारे गायक टाळ्या मिळाल्याशिवाय थांबत नाहीत. एखादा वक्ता सहजपणे म्हणतो, की मला आज इतक्या टाळ्या मिळाल्या. पुण्यासारख्या ठिकाणी (बापरे, आता मी मेलो) रटाळ गाणं किंवा भिकार भाषण चालू असेल तर लोक टाळ्या वाजवतात. पण लोकं आरतीला टाळ्या वाजवतात त्या मात्र असतात देवाकरता, पण अनेकांचं मनोरंजन करण्याची क्षमता असते! वानगीदाखल काही उदाहरणं घेऊ. टाळ्या वाजवताना कुठला हात हलतो आणि कुठला अचल राहतो? काही लोक उजवा तर काही डावा अचल ठेवतात. काही दोन्ही हात हलवतात! हे तरी ठीक आहे, पण टाळ्या निदान लयीत वाजवाव्या! तर तेही नाही. अनेक लोक एकदम रँडम टाळ्या वाजवत असतात. चालू असलेली आरती, तिची लय, त्यातले शब्द यांच्याशी संपूर्ण फटकून! म्हणजे नवीन निश्चल, भारत भूषण वगैरे लोकांचा अभिनयाशी होता तितकाही नाही. गाण्यातल्या...
लहानपणी पुण्याला जाणं, सुट्टीत, हे शाळेत असताना कॉमन होतं. आणि गेलो की सगळ्यात जास्ती सुमती मावशी, अर्थातच कारण म्हणजे बंडा/किरण. ज्योती/अनघा त्या मानाने लहान. अनुपमा आमच्याच वयाची. क्वचित कधीतरी चिंचवड, पण तिथे जाणं म्हणजे मोठा प्रवास होता. शिवाजीनगर बस स्टॅण्डवर जा, वाट बघा, मग एक पी एम टी ची बस येणार, मजल दरमजल करत पोचणार, आणि मग डुकरांना चुकवत तारा मावशीकडे. आता ते वाडे गेले, चिंचवडचं खेड्याचं रूप गेलं, डुकरं नाहीशी झाली. असो. तर पुण्याला गेलो की सगळ्या मावश्या इथे-तिथे रिक्षा करून जायच्या. आमची आई एकदम उस्ताद या बाबतीत. पण बाकी मावश्या पण काही कमी नव्हत्या. मी आणि किरण मात्र मैलोन मैल चालत फिरायचो. तसं बघितलं तर आता, अमेरीकेतली अंतरं बघितली तर पुण्यातली छोटी वाटतील, पण तेव्हा तसं वाटायचं नाही. मी आणि किरण, आणि क्वचित बंडा. आम्ही सुमती मावशीच्या घरून निघून शनिवार वाडा, पर्वती, बहुधा बिबवे वाडी वगैरे चालत फिरायचो. चालणं हे सुख नक्कीच होतं. तेव्हा पुण्यात इतकं प्रदूषण नव्हतं. ठाण्याच्या मानाने हवा चांगलीच थंड असायची. त्यामुळे कुठेही मी आणि किरण असलो तर आम्ही रिक्षा क...
Comments
Post a Comment